Share

अचानक लाहोरला उतरले तेव्हा जीवाला धोका नव्हता आणि शेतकऱ्यांमध्ये अडकले तर…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत काही त्रुटी आढळून आल्या. अचानक रस्ता मार्गाने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि रस्त्यावर आंदोलक आंदोलन करत असल्याने त्यांचा ताफा एका फ्लायओव्हरवर अडकून पडला. या प्रकरणावरून भाजप आणि कॉंग्रेसयामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण देखील चांगलेच तापत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेवरुन आता पंजाब सरकारला केंद्र सरकार धारेवर धरत आहे. मात्र यावर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (CM Charanjeet Singh Channi) यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. आता या प्रकरणावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका होता का, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी देखील वक्तव्यं केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार (Ravish Kumar) त्यांच्या कार्यक्रमात बोलत असताना एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान कुठल्या पूर्वसूचनेशिवाय अचानकपणे लाहोर विमानतळावर उतरले तर जीवाला काही धोका नाही पण अचानक शेतकऱ्यांसमोर अडकले तर मात्र जीवाला धोका कसं काय निर्माण झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता या प्रकरणी खरंच सुरक्षेत त्रुटी होत्या की हे कॉंग्रेस नेते म्हणतात तसं हे केवळ एक ढोंग होतं, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!