Share

‘वॉर्डरचना कशीही करा, मुंबई महापालिकेत यश आमचेच’; फडणवीस

Published On: 

पणजी : आगामी मुंबई महानगर पालिकेसह अन्य मनपा वार्डांची राज्यसरकार आपल्याला हवी तशी मोडतोड करत आहेत, आगामी महापालिका निवडणुकींसाठी हे प्रयत्न चालवले आहेत, मात्र तुम्ही वॉर्डरचना कशीही करा, यश आम्हालाच मिळेल असे भाजपा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले, पुढच्या वर्षी राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या मनपासह नगर पालिका, नगर पंचायतीमध्ये प्रभाग रचना कशी असावी, यावर आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी, अशी काही नेत्यांची मागणी आहे. नगरपंचायतीमध्ये एक सदस्य प्रभाग पद्धत तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. राज्य सरकार वार्डाच्या पुर्नरचणा करण्याच्या नावाखाली मुंबई मनपातील वार्डांची मोडतोड करत आहेत. राज्य सरकाच्या या धोरणाविषयी आम्ही निवडणुक आयोगाला कळवलं आहे. गरज पडल्यास कोर्टातही जाऊ असा इशारा भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंदे फडणवीस यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!