🕒 1 min read
मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत आणि वादात सापडलेले असतात. त्यांनी पदभार स्वीकारल्या पासून ते वादात आहेत. यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा असो की, सरकारचा एखादा निर्णय त्याचबरोबर महाआघाडी सरकार आणि भाजप मधील टीका टिप्पणी मध्ये देखील कोशारी यांचा समावेश असतोच यावरून आजच्या सामना अग्रलेखातून राज्यापालांवर टीका करण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमान उड्डाणाचा वाद सुरु असताना आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन ठाकरे सरकार वर भाजप कडून टीका केली जात आहे. तर आज शिवसेनेने ‘सामना’तून या राज्यपालांचं करायचं काय? हा भाजपचा प्रश्न असं राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितली व एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले? असा हटवादीपणा करण्याचे कारण काय? मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हा विमान-वाद वेगळ्याच हवेत उडवू लागले आहेत. राज्यपालांना विमान नाकारले हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला फडणवीस यांनी मारला. केंद्रीय गृहमंत्रालयास भारतीय संविधान, नियम, कायदा वगैरेंची चाड असेल तर अशा राज्यपालांचे पूर्ण वस्त्रहरण होण्याआधी गृहमंत्रालयाने त्यांना परत बोलवायला हवे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्राला आघाडी सरकारवर नेम धरता येणार नाही. सरकार स्थिर व मजबूत आहे आणि राहील. राज्यपालांचे काय करायचे हा भाजपचा प्रश्न !
राज्यपालांचे करायचे काय❓ असा प्रश्न पडलाय?
म्हणजे भारतरत्न महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय❓ असे विचारताय का,❓ तीच तुमची खरी अडचण आहे का❓
ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरु आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही..
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 13, 2021
दरम्यान, याला उत्तर देताना भाजपचे आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. ‘राज्यपालांचे करायचे काय?असा प्रश्न पडलाय? म्हणजे भारतरत्न महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय? असं विचारताय का? तीच तुमची खरी अडचण आहे का? ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरु आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही. घटनेनुसार विधिमंडळाचे कामकाज होत नाही. घटनेनुसार आमदारांना दिलेले हक्क तुम्हाला मान्य नाही. पंतप्रधान, राज्यपाल, न्यायाधीश अशा घटनात्मक पदांचा आदर करीत नाही. राज्यपालांचे करायचं काय? यापेक्षा जमलं तर मंत्रीमंडळातील सखाराम बायंडर प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा’, असं ट्वीट करत आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- लातुरात जिल्हा महाराष्ट्र केसरी साठी सज्ज; ४५ मल्ल निवड चाचणीला हजर
- खाम नदीसाठी छावणीच्या सीईओंचा पुढाकार
- अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचा वाद : बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे?
- …म्हणून कर्णधार कोहलीने बुमराहला दुसऱ्या कसोटीत दिली नाही संधी
- एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मनपा आढावा बैठकीत आकृतीबंध मंजूरीची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
