Share

काय फालतूपणा…! राज्यसरकारच्या ‘त्या’ निर्णयावर आरोह वेलणकर भडकला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद होती. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

कोरोनाचा संभाव्य धोका कमी झाल्याचे चित्र दिसत असताना येत्या शुक्रवारपासुन शहरातील नाट्यगृहे पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. नाट्यगृहांपाठोपाठ बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. तथापि, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांमध्ये आसन क्षमता ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.

यावरच आता मनोरंजन क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. फक्त ५० टक्के आसन क्षमता मर्यादित ठेवण्यात आल्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता तसेच राजकीय घडामोडीत सक्रिय असणारा आरोह वेलणकर याने राज्य सरकारला टोमणा लागलावला आहे. तसेच त्यांच्या या निर्णयावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. 

आरोह वेलणकराने ट्विट करत लिहिले की, ‘५० टक्के काय फालतूपणा आहे. बंदच ठेवा मग! काहीही उपयोग नाही ह्याचा. अजून किती दिवस असच चालू ठेवणार आहात!??? इतर सर्व राज्यांमध्ये चालू आहे पूर्वीसारखे, मग महाराष्ट्रात का नाही?! असा सवाल करत अभिनेत्याने राज्य सरकारला सुनावले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!