मुंबई : आरेमधलं कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजप नेते व आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आणखीही घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा, असा सल्ला आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.
कांजूरमार्गची जी जागा आहे जिथे मेट्रोचं कारशेड तयार होणार आहे, ती जागा न्यायप्रविष्ट आहे. तिथे तिवरांची झाडे आहे. तसंच ती जागा लिटीगेशनमध्ये आहे. तिथे कारशेड कसं तयार होणार?, असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारला आहे. कोरोना संकट काळात ते बाहेर पडत नाहीत, घरात बसतात, लोकांनी घरात बसावं असं त्यांना वाटतं, असा टोला लाड यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ” आरे मधलं कारशेड कांजूरमार्ग ला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे असे आ. प्रसाद लाड म्हणाले असं मी ऐकलंय.. मग प्रश्न असा आहे की, मागील सरकारच्या काळात पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी ॲक्सिस बँके मध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा ??”असा खोचक प्रतिप्रश्न मिटकरींनी लाड यांना केला आहे.
आरे मधलं कारशेड कांजूरमार्ग ला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे असे आ. प्रसाद लाड म्हणाले असं मी ऐकलंय..
मग प्रश्न असा आहे की, मागील सरकारच्या काळात पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी ॲक्सिस बँके मध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा ??@PrasadLadInd— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 13, 2020
कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर आरेतील आदिवासी नागरिकांनी साखर वाटून स्वागत केले. तर, भाजपने यामुळं सरकारचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून सुरु झालेल्या कामाला अधिक विलंब लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत’
- मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन, प्रविण दरेकर-प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- ‘ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे’
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

