Share

आरोग्यासाठी निधी कमी पडु देणार नाही म्हणता आणि पगार मागितला तर अडचणी काय सांगता ? ‘आयटक’चा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील कोविड योद्ध्यांना सामावून घेण्याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. औरंगाबाद मनपातील कोविड योद्ध्यांना ६ महिन्यापासुन पगार नाही. आरोग्यासाठी निधी कमी पडु देणार नाही म्हणता आणि पगार मागितला तर अडचणी काय सांगता ? असा सवाल आयटकच्या वतीने थेट मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादला मुख्यमंञी उद्धव ठाकरे आले होते. यावेळी आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे विमानतळावर निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, नेहमी दिलासादायक बोलणारे मुख्यमंञी कोविड योध्यांच्या पगाराचा विषय काढताच अडचणी आहेत. आपण एक एक प्रश्न सोडवतोय असे सांगितले जाते. आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी अ‍ॅड. अभय टाकसाळ यांनी आरोग्यासाठी निधी कमी पडु देणार नाही म्हणता आणि पगार मागितला तर अडचणी काय सांगता ? याबाबत विचारले.

याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथील कथित कंञाटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले. परंतु अजुन अंमलबजावणी केलेली नाही. असेही आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना . यावेळी शिष्टमंडळात युनियनचे सेक्रेटरी अ‍ॅड. अभय टाकसाळ यांच्यासह विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!