Share

आता भाजपमुक्त महाराष्ट्र करणार – अप्लेश ठाकोर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: गुजरातमध्ये माझ्या बरोबर हार्दिक पटेल आणि जिग्नेशने निर्माण केलेल्या प्रखर लढ्यामुळे भाजपची पीछेहाट झाली. सध्या देशात सुरु असणाऱ्या भाजपच्या एकदाधिकारशाहीमुळे संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरु केलेल्या लढ्याला साथ देवून भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी व्यक्त केला आहे. मुंब्रामध्ये आयोजित मुशायरा कार्यक्रमात ठाकोर बोलत होते.

देशातील दलित आणि अल्पसंख्याकांना दहशतीखाली जगाव लागल असून संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. देशातील कोटय़वधी जनतेला आपली अर्धी भूकही भागवता येत नाही. याकडे लक्ष द्यायला पंतप्रधानांना वेळ नसल्याचे भुकेच्या बाबतीत भारताने गाठलेल्या वरच्या क्रमांकावरून सिद्ध झाले असल्याचा आरोप यावेळी ठाकोर यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!