Share

“…आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार”,संजय राऊतांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (१८ मार्च) होळीच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी बोलत असतांना राऊतांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार, असा दावाही यावेळी राऊत यांनी केला.

यावेळी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘शिवसेना मोठा पक्ष असून शिवसेनेचे आव्हान आहे. ज्याचे आव्हान असते त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. भाजपच्या दंडात ताकद आहे असे त्यांना वाटत असते. परंतु तसेच नाही कारण ते पाठीमागून वार करतात’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राजकारणात पाठीमागून होणारे हल्ले पचवायचे असतात आणि आम्ही ते पचवत आहोत.’ तसेच ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार,असा दावाही यावेळी राऊत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!