Share

आम्ही दिलेल्या कर्जमाफीमुळे विरोधकांबरोबरच मित्रपक्षात पोटशूळ – दानवे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- जालना , आम्ही दिलेल्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार असून सर्वसामान्य शेतकर्यांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याने विरोधकांबरोबरच मित्रपक्षात पोटशूळ उठला आह, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली. अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.मोबाईलचे बटन दाबा व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची ऑनलाईन यादी पाहा, मग यावर बोला असे जाहिर अवाहन दानवे यांनी केले आहे. पूर्वीच्या सरकारने 60 हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी होती, या कर्जमाफीमुळे शेतक-यांचा नव्हे तर बुडीत निघणा-या बँकांचा फायदा होत होताया वेळी आमदार नारायण कुचे यांनी सत्तेत असलेला मित्रपक्ष विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचे पाप करत असल्याची टीका केली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!