🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- राज्यातले सगऴ्यात कमी मतदार संघ असलेलेजे दोन तीन जिल्हे आहेत त्यामध्ये वाशिम जिल्ह्याची गणना होते. जिल्ह्यात रिसोड, वाशिम आणि कारंजा या 3 मतदारसंघात भाजपा 2 तर कॉग्रेसचा 1 विद्यामान आमदार आहे. जेमतेम 3 मतदारासंघाचा आटोपतापसारा असुनही जिल्ह्यात अतंर्गत गटबाजीला ऊत आला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीयांची गटबाजी चव्हाट्यावर आली अहे. पक्षांतराचा फटका राष्ट्रवादीला इथंही बसतोआहे. वंचित विकास आघाडीची चाचपणीही सुरु असुन जिल्ह्यावर भारिपचाही चांगलाप्रभाव आहे. मुऴ कॉग्रेसच्या या बालोकिल्ल्यात भाजपाचा जोरही चांगलाच वाढत आहे.त्यामुळं जिल्ह्यातील निवडणुका नुसत्या चुरशीच्या नाही तर रंगतदारही होतील असं सध्या तरी चित्र आहे.
वाशिम विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १६ जणांचे अर्ज मागे घेण्यात आल्याने आता ४४ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. वाशिममधील तीन मतदारसंघात १६ उमेदवारांनी माघार घेतली असून, ४२ उमेदवार रिंगणात आहेत.
येथे वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर शशिकांत पेंढारकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात कायम असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी रिसोड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181545201522761728?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181547001541869568?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
