मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक पंकजा मुंडे समर्थक नाराज होते. याच पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचेही वृत्त होते. यानंतर काल पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज समर्थकांशी संवाद साधत त्यांना विश्वास दिला.
परंतु यावेळी यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. शिवाय सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळता विनामास्क सभा आयोजित केली. तसेच त्याठिकाणी उपस्थित राहिले म्हणून वरळी पोलीस पोलीस उपनिरिक्षक प्रदीप सोनावणे यांच्या फिर्यादीवरुन वरळी पोलिसांनी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यात ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी १७ जणांना ताब्यात घेत नोटीस देत सोडून देण्यात आले आहेत. आयोजक तसेच सभेत उपस्थित असलेल्या सर्वाविरोधात हा गुन्हा दाखल असल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल कोळी यांनी सांगितले आहे.
दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाबाहेर बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर, अहमदनगर अशा विविध भागातून अनेक कार्यकर्ते, राजकीय नेते येथे दाखल झाले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण करत आपली भूमिका मांडली.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांनो काळजी घ्या ! शहरात आज ३३१ नव्या रुग्णांची नोंद
- ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली लग्नात खोडा घालणाऱ्या ‘त्या’ कट्टरतावाद्यांवर कडक कारवाई करा, अंनिसची मागणी
- शिवसेनेच्या दोन कट्टर विरोधकांची झाली दिल्लीत भेट, ‘या’ प्रमुख विषयांवर झाली चर्चा
- ‘लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश देणार’ ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- शरद पवारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते माझ्यावर नाराज नाहीत – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
