🕒 1 min read
मुंबई : विधानसभेसाठी उमेदवारी नाकारलेल्या विनोद तावडे(Vinod Tawde) यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देत उमेदवारी नाकारली तरी संयम दाखविल्याने चांगले फळ कसे मिळते, याचे हे उदाहरण आहे, असे तावडे म्हणाले.
भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा(Jagatprakash Nadda) यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करताना तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविली आहे. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजप सरचिटणीसपदी नियुक्ती झालेले तावडे हे महाराष्ट्रातील पहिलेच नेते आहेत. नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि लोकसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती.
दरम्यान, पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर नेत्यांकडून संयम पाळला जात नाही. मला उमेदवारी नाकारल्यावर मी म्हटले होते की, मला भाजपचा प्रदेश सरचिटणीस केले होते, तेव्हा बरे वाटले होते. विधान परिषदेवर निवडून आलो आणि विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. मंत्री झाल्यावर आठ खाती एकटा सांभाळत होतो, ज्यासाठी या सरकारमध्ये आठ मंत्री आहेत; पण ही जबाबदारी सांभाळताना खूप चांगले वाटत होते. त्यामुळे एखादे वेळी तिकीट मिळाले नाही, तर मी आता पक्ष सोडतो, वगरे म्हणणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या स्वभावात नाही. मी संयम दाखविला. जे काम दिले जाईल ते प्रामाणिकपणे करायचे. मग तुमची दखल नक्की घेतली जाते. हे मात्र आजच्या माझ्या उदाहरणावरून कार्यकर्त्यांना अधिक स्पष्ट झाले असेल, असेही तावडे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आर्यन खान प्रकरण कशासाठी घडवले याचा तपास करावा लागेल- दिलीप वळसे पाटील
- ‘जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातय’
- ‘सीएए, एनआरसी मागे घ्या नाहीतर…’, ओवैसींचा मोदी सरकारला इशारा
- ‘इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना डासांप्रमाणे चप्पलेखाली चिरडलं अन्…’
- गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू; भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
