🕒 1 min read
नागपूर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत असा गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकाआघाडीच्या मंत्र्यांवर केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळूचोरी, तस्करी या प्रकारचे धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. असा धक्कादाय आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
तर, रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या अ़डवायच्या नाहीत, असा एसपी आणि कलेक्टरांना अलिखित आदेश देण्यात आलेला आहे. आमचे कार्यकर्ते बिनधास्त गाड्या चालवतील, असा कारभार चालला आहे. सर्वांनी जिल्हे वाटून घेतले आहेत. अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामधून मोठी कमाई केली जात आहे, असा खळबळजनक आरोप बावनकुळे यांनी केला.
यावर आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांना सत्तेत असताना चालवलेल्या अवैध धंद्यांची आठवण येत असावी. बावनकुळे यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत. तसेच असे आरोप करताना भान ठेवावं, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अवैध धंद्यांसाठी महाविकास आघाडीने जिल्हे वाटून घेतले, बावनकुळेंचा गंभीर आरोप
- बाराक ओबामांच ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात रामायण-महाभारताचा उल्लेख!
- पवारांचा दौरा रद्द झाल्यानंतर एकनाथ खडसेंचे मोठे विधान…
- ‘या खोटारड्या उर्जामंत्र्यांवर हक्कभंग आणणार…’
- ‘चेन्नईने आता धोनीचा नाद सोडून द्यावा…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
