🕒 1 min read
मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना काळातील वाढीव व चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देणार नाही असं सांगून खोटं बोलणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी संगितले आहे. भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव तयार झाल्याचेही व अर्थ खात्याबरोबर बैठक झाली असेही संगितले व राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढच्या आठवड्यात प्रस्ताव आणला जाणार असे जाहीर करून आज घुमजाव केल्याबद्दल विधानसभेच्या आगामी अधिवेशनात ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही हे ऊर्जा मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे केवळ बेशरमपणा नसून खोटारडेपणाचा कळस अशी घणाघाती टीका ही आमदार भातखळकर यांनी केली आहे.
खोटरड्या ऊर्जा मंत्र्यांवर
हक्कभंग आणणार… @NitinRaut_INC pic.twitter.com/kdPtlRiMRT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 18, 2020
महत्वाच्या बातम्या
- आजपर्यंतचा सर्वात कठीण निर्णय म्हणत, ‘या’ क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती!
- आजपर्यंतचा सर्वात कठीण निर्णय म्हणत, ‘या’ क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती!
- ‘अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल’ !
- दुसरी लाट आली तर यंत्रणा सज्ज, पुणेकरांनो तुम्ही काळजी घ्या – महापौर
- ‘बिहारच्या विकासासाठी भाजप नेत्यांनी काम करावं, यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
