Share

खर्च सादर न करणे भोवले; १५६ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास बंदी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वेळेत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीतील १५६ उमेदवारांना पुढील पाच वर्षांकरता निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.विहित मुदतीत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. या नोटीसवर सुनावणीदरम्यान उमेदवारांना लेखी तसेच समक्ष मत मांडण्याची मुभा देण्यात आली होती. खर्च सादर न केलेल्या १७० उमेदवारांपैकी १४ उमेदवारांचे म्हणणे व त्यांनी सादर केलेले पुरावे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले. त्यामुळे उर्वरित १५६ उमेदवारांवर पुढील ५ वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निकालानंतर ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक असते. विहित मुदतीमध्ये खर्च सादर न केल्यास उमेदवाराला आदेशाच्या दिनाकांपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!