Share

येत्या निवडणुकीत जनताच या सरकारला ऑफलाईन करुन टाकेल’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- कर्जमाफी जाहीर केल्यापासून चार महिन्यात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्याच नाही तर योजनेला छत्रपतींचे नाव देऊन त्यांचाही अपमान केल्या. हे सरकार शेतकरी ही जाताच मुळापासून संपवू पाहत आहे. सगळं ऑनलाईन करा म्हणणाऱ्या सरकारला येत्या निवडणुकीत जनताच ऑफलाईन करुन टाकेल. असा टोला  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लावला .माढामधील साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

राज्यातील सगळे सरकारच अकार्यक्षम असून कोण कोणाला काढणार? आता वैतागलेली जनताच यांना नारळ देईल. अशी सडकून टीका धनंजय मुंडें यांनी यावेळी केली.राज्यावरील कर्जाचा बोजा सव्वा चार लाख कोटींवर गेला असून ३ वर्षात दीड लाख कोटी कुठे गेले याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावेच लागणार आहे. असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!