मुंबई- हाथरस प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हाथरस येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या अमानुष हत्येचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून आज सर्व राज्यांमध्ये जिल्हापातळीवर सत्याग्रह करणार आहे.
हाथरस येथील दलित महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या मृत्यूचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
हाथरस मध्ये जे काही घडलं ते अतिशय वेदनादायी घडलं. हे सर्व मानवजातीला लज्जास्पद गोस्ट आहे. हा खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवला गेला पाहिजे सुप्रिम कोर्टाने राजधर्माचे पालन केले पाहिजे. या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची श्यक्यता आहे असं देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :-
- …तर मी भाजपात प्रवेश करेन,बच्चू कडू यांनी दिले थेट मोदींना आव्हान
- राज्यात कोविड संदर्भात तब्बल 2 लाख 75 हजार गुन्हे; 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी
- अखेर चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना रखडलेला उदरनिर्वाह भत्ता मिळाला
- मिशन बिगिन अगेन : रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर
- लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली


