🕒 1 min read
मुंबई – कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्हयात येणाऱ्या चांदोली अभयारण्यग्रस्त १८ वसाहतीतील ५३७ प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी १९ लाख रुपयांचा रखडलेला उदरनिर्वाह भत्ता आज प्रातिनिधिक स्वरूपात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाटप केला.
दरम्यान रोजंदारीवर जाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला आता दिलासा मिळेल याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समस्या निवारण सप्ताह आयोजित करावा असे निर्देश यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मागील भाजप सरकारच्या काळात आम्ही अनेकदा मागणी करूनही निधी मिळाला नव्हता मात्र राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापित झालेल्या महाविकासआघाडी सरकारने हा प्रश्न प्राथमिकतेने मार्गी लावला याचा आनंद होतोय असे मंत्री जयंत पाटील म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी पवार सरसावले; अनिवासीय मराठी भारतीयांसोबत साधला संवाद
- मुंबई पोलिसांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले’
- प्रियांका गांधी यांच्यासोबत उत्तरप्रदेश पोलीसांनी केलेल्या असभ्य वर्तनाबद्दल नीलम गोऱ्हे यांचे अमित शहा यांना पत्र
- मिशन बिगिन अगेन : रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर
- लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
