Share

UP Assembly Election 2022 : “देशाला भयापासून मुक्त करा”, राहुल गांधींचे ट्वीट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: यूपी विधानसभा निवडणुक मतदानाचा (UP Assembly Election 2022)आज पहिला टप्पा सुरु झाला आहे. आज यूपीतील ५८ जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान युपी निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.

“देशाला भयापासून मुक्त करा, बाहेर या, मतदान करा”, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियमांचे पालन करून लोकशाहीच्या या पवित्र सणात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना गरीब वर्गातील मतदारांना घाबरवले जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने ट्विटद्वारे केला आहे. त्यामुळे मतदानाच्या पहिल्याच दिवशी यूपीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

दरम्यान मतदानाच्या पहिल्याच दिवशी EVM मशीनमध्ये खराबी झाल्याचे समोर आले आहे. मथुरा येथील बलदेव विधानसभा क्षेत्रातील फरह येथे ईव्हीएम मशिन खराब झाले आहे. बुथ क्रमांक ४४२ वर ईव्हीएम मशिन खराब झाल्याने मतदान थांबले आहे. तर मुजफ्फरनगरच्या इस्लामिया इंटर कॉलेज पोलींग बुथावरही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!