Share

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईत वाढ व्हावी – चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : ‘अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मर्यादा देखील वाढवावी आणि सांगली कोल्हापूरमध्ये महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची सरकारच्यावतीने तातडीने पुनर्बांधणीच्या कामास तातडीने सुरुवात करावी,’ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील असे म्हणाले.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर पाटील बोलत होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सध्या एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. याद्वारे त्या कुटुंबाला आपला उदरनिर्वाह चालवणे शक्य नाही. त्यामुळे मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात यावी,’ असे ते म्हणाले.

तसेच यंदा अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

दरम्यान, अपाघातामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, त्यांच्या कुटुंबीयांना आपण चार लाखाची नुकसानभरपाई देतो, त्यामध्येही वाढ करण्यात यावी आणि यामध्ये विम्याचा समावेश करण्यात यावा, असे पाटील म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!