मुंबई : ‘खतांची निर्मिती, वाहतूक आणि उपलब्धतेवर खत विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्या अनुषंगाने विविध राज्य सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाच्या सतत संपर्कात असल्याचे, ‘केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितले.
याबाबतची माहिती गौडा यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमातून दिली आहे. गौडा म्हणतात, ‘आगामी खरीप हंगामासाठी देशात पुरेसा खतांचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी रसायने आणि खत मंत्रालयाचा खत विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.
‘कर्नाटक राज्याचा विचार केला तर राज्यात बियाणे, खते आणि कीटकनाशकांची कमतरता नाही. यासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारशी सतत संवाद साधत आहोत,’ याबाबत माहिती डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

