🕒 1 min read
Uddhav Thackeray । मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री अटक झाली. यांच्या अटकेनंतर राज्याचे राजकारण आता चांगलेच तापलेले दिसत आहे. सध्या राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. आता राऊत यांची अटक भाजपच्या सांगण्यावरून झाली आहे. असा गंभीर आरोप शिवसेनेकडून लावला जात आहे. या आरोपमध्ये काहीच तथ्य नाही व हे आरोप खोटे असल्याचे काल भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणावर आता शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले कि, संजय राऊतांबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. गुन्हा काय संजयचा. पत्रकार आहे. शिवसैनिक आहे. निर्भिड आहे. जे पटत नाही ते बोलतोय. मरण आलं तरी शरण जाणार नाही. हे त्याचं वाक्य चांगलं आहे. तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण झाले हमाममध्ये गेले आंघोळीला गेले. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. नड्डांचे विधान हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे असून, ओडिसा, तेलंगणा, तामिळनाड महाराष्ट्रात शिवसेना ही संपण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा एकदा करून बघावं असे आव्हान ठाकरे यांनी नड्डांना दिले आहे. तसेच पुढे पक्षात काम केलेले लोक आपल्याकडे येत आहेत. मग जर इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर, मग भाजपचा वंश तरी नेमका कोणता हे तपासणे महत्त्वाचे आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, याआधी आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या परिवाराची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या भांडुप मधील निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आई आणूनि पत्नीची भेट घेतली. यावेळी त्यांनी राऊतांच्या कुटुंबियांना धीर दिला त्यांची विचारपूस केली. मात्र यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “आमची वेळ येईल तेव्हा…” राऊतांच्या अटकेवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Uddhav Thackeray । भाजपचा वंश तरी नेमका कोणता? नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊत यांना ४ दिवसाची ईडी कोठडी
- Aaditya Thackeray | दोन लोकांच्या जम्बो मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण तेच समजत नाहीये – आदित्य ठाकरे
- Aaditya Thackeray : चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्यावा, बघू सत्य जिंकते की सत्ता; आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
