मुंबई: नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नक्षलवादी कारवाया, नक्षलग्रस्त भागांचा विकास, शहरी नक्षलवाद या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार, २६ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्रपणे चर्चा होणार का, याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता अनेक अर्थांनी उद्धव ठाकरे यांची ही दिल्लीवारी चर्चेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राज्यांमधील नक्षलवादाशी मुकाबला करण्यासाठी केंद्राचे जे राष्ट्रीय धोरण आहे व कृती आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे, त्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. २०१५ मध्ये केंद्राने याबाबत धोरण निश्चित केले असून त्यात सुरक्षा उपाययोजना, विकासाला चालना आणि स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा गुरुवारी एक बैठक बैलावली असून, त्यात दिल्लीतील बैठकीत मांडायचे मुद्दे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता
- सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती मग त्यांना नेमकं काय माहित असतं ?
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- पन्नास लाखांसाठी तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार – चंद्रकांत पाटील
- समृद्ध, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या जडणघडणीतील कर्मवीर अण्णांचं योगदान मोलाचे आहे – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

