Share

‘उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं’, कांचन गिरींचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : माध्यमाशी संवाद साधत असतांना कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच यावेळी हिंदुराष्ट्राच्या बांधणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेत असल्याचेही कांचन यांनी सांगितले. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कांचन गिरी आणि सुर्याचार्य दोघे मुंबईत दाखल झाले आहेत.

यावेळी कांचन गिरी म्हणाल्या की,’उद्धव ठाकरे यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे.’

दरम्यान, पुढे बोलत असतांना ‘उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला. त्यासाठी मी नाराज आहे. पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते’, असा आरोपही यावेळी कांचन गिरी यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!