उस्मानाबाद : शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा नाही, यावर्षीचा अग्रिमही नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आणि तीन आमदार असताना शिवसेनेने केले काय, असा प्रश्न उपस्थित करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, तुळजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार कैलास पाटील यांनी केवळ रस्ता अडवायचा प्रयत्न तर करून पाहा, असे थेट आव्हान देत भाजपाचे मोदी शेतकरी विरोधी असल्याचा दावा केला आहे. शिवसेना आमदार कैलास पाटील म्हणाले की, ‘भाजपचे केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे सिध्द होत असल्याचे लक्षात येऊ लागल्यावर पत्रक काढुन शिवसेनेवर आरोप करण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न आहे. शिवसेनेला हिशोब मागायची किमान तुमच्यात नैतिकता उरली नाही.’
‘तुमच्या ४० वर्षाच्या कारभाराचाही लेखाजोखा मांडलात तर जनतेलाही बर वाटेल. जिल्ह्यात ४० वर्षात विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचे काम शिवसेनेच्या फक्त दोन वर्षाच्या सत्तेत होत आहे, याचा तुम्हाला पोटशुळ सुटला आहे. शिवसेनेच्या मंत्र्याचा रस्ता आडवायचा नुसता प्रयत्न तरी करुन बघा, मग समजेल पत्रक काढण्याइतक ते सोप आहे का’, असेही प्रतिआव्हान त्यांनी पत्रकात आमदार राणा पाटील यांना दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात-आ.सतिश चव्हाण
- आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- मी नरेंद्रजींना म्हणालो, आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल; फडणवीसांचे मिश्किल विधान
- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

