Share

‘अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडवल्या, इथेही वसुली सुरू आहे का?’, आशिष शेलारांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजप-शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार वकील आशिष शेलार यांनी, ‘मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या १३२ अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातल्या बदल्यांप्रमाणेच आता महापालिकेतही वसुली केली जात आहे का?,’ असा सवाल शिवसेनेला केला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून हा सवाल उपस्थित केला असून, ‘मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह इतर आरक्षणांच्या रिक्त जागांवर महापालिकेत सेवेत असलेल्या १३२ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला, परंतु ४ सर्वसाधारण सभानंतरही सत्ताधारी शिवसेनेने, या प्रस्तावाच्या मंजुरीला विलंब केल्याने, हा उशीर का करण्यात येतोय?, असाही सवाल त्यानी विचारला आहे.

चिटणीस पदावर शुभांगी ‘सावंत’ यांना डावलून संगिता ‘शर्मा’ यांना बढती देण्यात आली आहे. आता 132 मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक करण्यात आली आहे. मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली? मुंबईकर हो, हे पहा अवतार मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे ?, मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!