🕒 1 min read
औरंगाबाद : हायवा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी भरधाव रिक्षा हायवावर आदळून दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात दोन जिवलग मित्र ठार झाले. हा अपघात पैठण रोडवरील गेवराईजवळ रविवारी रात्री घडला. हबीब इसाक चाऊस (३०) व अफरोज पठाण (३५, दोघेही रा. अरबगल्ली, बिडकीन) अशी मृत तरुणांची नाव आहेत.
बिडकीन येथील हबीब आणि अफरोज हे दोघेही रिक्षा चालक तसेच लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. दररोज शहरात येऊन दिवसभर रिक्षा चालविल्यानंतर रात्री परत गावाकडे जायचे. रविवारी देखील दोघांनी दिवसभर रिक्षा चालविली. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास बिडकीनच्या दिशेने निघाले होते.
गेवराई गावाजवळ येताच समोरून जात असलेल्या हायवा चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे पाठीमागून येणारी दोघांची रिक्षा (एमएच-२०-ईएफ-१२८४) हायवावर धडकली. या अपघातात रिक्षातील हबीब आणि अफरोज गंभीर जखमी झाले. दोघांना नागरिकांनी तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान हबीब आणि अफरोज यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देवदूता प्रमाणे रेल्वे पॉईंटमनने वाचवला चिमुकल्याचा जीव, रेल्वेमंत्र्यांनी केले कौतूक
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’


