अमरावती : राज्यातील सहा जिल्हा परिषदांतील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. आज या जागांचा निकाल लागला. निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र, पक्षीय बलाबल पाहता भाजपनेच कुरघोडी केल्याचे दिसत आहे.. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी मतदान झाले. त्यात काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांकडे गेल्या आहेत.
या निकालावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा निकाल लागला, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले.
‘देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातात. त्यांच्या व्यथा जाणून समजून घेतात. त्यामुळे नागरिकांनी भाजपाला साथ दिली, असे नवनीत राणा म्हणाल्या. नागरिकांनी शिवसेनेला नाकारले आहे. त्यामुळे लोकं कोणासोबत आहे हे समोर आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल हा तर फडणवीस यांच्या मेहनतीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा रिझल्ट आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
- महिलाविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज – यशोमती ठाकूर
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत’
- ‘तुझ्यात जीव..’फेम हार्दिक जोशी मालिकेपूर्वी करायचा ‘हे’ काम
- भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

