मुंबई: ओबीसीच्या राजकीय आरक्षणामधला अडसर लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर मागास समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक विधेयक विधानसभेत आणलं आहे. मागास जातींना राजकीय आरक्षण मिळावं आणि शासनाच्या माध्यमातूनच निवडणूक लावाव्यात या संदर्भातील सुधारणा विधेयक आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आलय यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज एक नव्या इतिहासाची सुरुवात महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाली आहे, असे पटोले म्हणाले. राज्य निवडणूक आयोगाच्या हाती काही सूत्र होती. त्यानुसार राज्य सरकारची तयारी नसताना निवडणुका लावल्या जात होत्या. 73 व्या घटनादुरुस्तीसंदर्भातील दुरुस्त्या राज्याने केल्या नव्हत्या. मध्य प्रदेश सरकारने या दुरुस्त्या केल्या होत्या. आता महाराष्ट्र सरकारनेही दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी काळात या विधेकायामुळे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

