🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मविआ सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर काही निर्णयांवर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून मविआ नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावे असणारी एक योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या कारभाराला गती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा आराखडा २१०० कोटींचा होता. त्यापैकी ७४.०२ कोटी उपलब्ध झाले असून ३४.७९ कोटी रुपये खर्च झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्त पदांची भर्ती करून या योजनेला गती देण्याचे आदेश दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनेचे नाव मविआ सरकारने बदलले होते. या योजनेतून ६० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर निधीपैकी प्रत्येक महिन्यात सात टक्के प्रमाणे निधी योजनेला मिळेल.
महत्वाच्या बातम्या:
- Uday Samant | आमच्या मनात उद्धव साहेबांसाठी आदर कायम राहणार – उदय सामंत
- SL vs PAK : हसन अलीने सोडला सोपा कॅच, सोशल मीडियावर झाला तुफान ट्रोल; पाहा VIDEO!
- Sanjay Raut : “उनकी मुस्कुराहट पर न जाना…”, संजय राऊतांनी पोस्ट केला ‘तो’ फोटो
- Sanjay Raut : राज्यपाल दरवाजे, खिडक्या बंद करून बसलेत, त्यांना काहीच दिसत नाही; संजय राऊत आक्रमक
- Imtiyaz Jaleel । संभाजीनगर नामांतराचा सर्वसामान्य नागरिकांनी विरोध करावा – इम्तियाज जलील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
