औरंगाबाद:महावितरणकडून गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब (Prashant bumb) यांनी महावितरणला पत्र लिहून कुठलीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांची वीज कापल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला आहे. महावितरणवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाकडून महावितरणला शेकडो कोटी रुपयांचे अनुदान हे खास शेतकऱ्यांसाठी दिले जाते. मात्र एवढे अनुदान देऊनही शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संतापलेल्या प्रशांत बंब (Prashant bumb) यांनी महावितरणला तीन पाणी पत्र लिहून उत्तर मागितले आहे. बंब यांनी महावितरण कंपनीकडे राज्य सरकार सोबत झालेले सगळे करार त्याचबरोबर न्यायालय मधून आलेले अनेक आदेश आणि वेळोवेळी संघटना तसेच झालेल्या चर्चांचे सर्व पत्र कागदपत्रे आणि अहवाल देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी महावितरणला दिला आहे. गंगापूर तालुक्यात विद्युत रोहित्र बंद करणे या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करणे, अशा स्वरूपाच्या कारवाई महावितरणकडून सुरू आहेत. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा सुद्धा घेतलेला आहे. तत्पूर्वी कायदेशीर बाब म्हणून आमदार प्रशांत बंब (Prashant bumb) यांनी महावितरणला हे पत्र पाठवले. या पत्रानंतर महावितरणने जर का समाधानकारक भूमिका नाही घेतली तर कदाचित गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- आशिष शेलारांवर कारवाई सुडबुद्धीने- प्रविण दरेकर
- ‘आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून…’, फडणवीसांचे टीकास्त्र
- कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीबाबत केले मोठे वक्तव्य
- ‘सर्वांनी दूसरा डोस घ्या अन्यथा…’; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे मोठे विधान
- एक जागा तीन दावेदार…कोण असणार एकदिवसीय संघाचा उपकर्णधार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

