🕒 1 min read
मुंबई : दहीहंडी निमित्त आज राज्यभरात मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर अनेक नेत्यांनी मोठ्या जल्लोषात दहीहंडीचं आयोजन केलं आहे. यादरम्यान अनेक नेते एकमेकांवर टीका देखील करताना दिसत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या भाषणातील एका वाक्यची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या याच वाक्याला जोरदार उत्तर दिलं आहे.
अमोल मिटकरींचा निशाणाः
अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही मलई गोरगरिबांपर्यंत पोहोचवू, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता कदाचित सुरत व गुहाटीमध्ये बसून गल्लेलठ्ठ मलाई खाऊन टुम झालेल्या चाळीस गरीब गोविंदांना ठाण्याहून आणलेल्या मलाई बाबत बोलले असावेत, असा टोला मिटकरी यांनी लगावला.
पाहा ट्विटः
देवेंद्र फडणवीस जी दहीहंडी कार्यक्रमात बोलले _"आम्ही मलाई गोरगरीबां पर्यंत पोहचवु" — कदाचित ते सुरत व गुवाहाटी मधे बसुन गलेलठ्ठ मलाई खाऊन टुम झालेल्या 40 गरीब गोविंदांना ठाण्यातुन आणलेल्या मलाईबाबत बोलले असावेत#मलाईदारसरकार
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 19, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Government scheme | महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या 22 योजना पुन्हा सुरू ; शिंदे सरकारचा निर्णय
- Salman Khan | सलमान खान महिलांना मारहाण करतो; एक्स गर्लफ्रेंडचा पुन्हा एकदा गंभीर आरोप
- Nitesh Rane | “उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कोणी करू नये” ; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- Rajendra Raut । दिलीप सोपलांची ईडी चौकशी लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही; राजेंद्र राऊतांचा इशारा
- Devendra Fadnavis | हे मुठभर लोकांचे सरकार नाही ; देवेंद्र फडणवीसांचे तुफान भाषण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
