🕒 1 min read
नाशिक– साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन ऐतिहासिक कसे होईल, यासाठी आपण सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
यंदाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार हे निश्चित झाले आहे. यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य मंडळाकडे मागणी केली होती. याबाबत लोकहितवादी मंडळातील काही सदस्यांनी आपली भेट घेऊन याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानुसार त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आपण कळविले होते. त्यानंतर आज साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
नाशिकला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहे. या भूमीची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास होणे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. हे संमेलन मार्च महिन्यात होणार आहे. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन ऐतिहासिक कसे होईल, यासाठी आपण सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देऊ तसेच नाशिककरांच्या वतीने देशभरातून आलेल्या साहित्यिकांचा योग्य असा मान-सन्मान ठेवला जाईल असेही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. संमेलनाची माहिती देण्याकरिता औरंगाबादेत पत्रकार परिषद घेण्यात आली. संमलेनाच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस संमेलन भरवले जाईल असे ठाले पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- अखेर ठरले! यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘या’ ठिकाणी होणार
- संभाजीनगर’ हा भावनिक मुद्दा नसून; आमच्या हिंदू अस्मितेचा – अंबादास दानवे
- हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार; भाजप नेत्याची बोचरी टीका
- अजून काय मागणार… सोनू सूद साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत
- सावधान ! कोरोना लसीसाठी ऍप डाऊनलोड करू नका आरोग्य विभागाची सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
