Share

३० वर्षात शासकीय सुविधेपासून वंचित असलेल्या ‘या’ गावाला मिळणार दिलासा

Published On: 

औरंगाबाद : अनाड येथील बरड वस्तीला मागील ३० वर्षांपासून कोणत्याही शासकीय मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, याबाबतचे वृत्त अनेक वर्तमान पत्रात प्रकाशीत होताच. मा.जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या आदेशाने आज सिल्लोड चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, व सिल्लोड महावितरण चे उप कार्यकारी अभियंता यांनी अनाड बरड वस्तीला तात्काळ भेट देऊन मूलभूत समस्यांचा आढावा घेतला.
 मागील काही दिवसांपासून वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर अनाड येथील बरड वस्तीवरील समस्या या विषयी व्हिडीओ व बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. बरड वस्तीला उपविभागीय अधिकारी यांच्यासह  तालुक्यातील मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. नागरिकांच्या समस्या जानुन घेत, बरड वस्तीवरील विज, पाणी, रेशन यासारख्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ आदेश दिले. पुढील काही दिवसात या समस्या प्राधान्य क्रमाने मार्गी लावल्या जातील असे यावेळी बोलतांना उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, महावितरण चे सिल्लोड महावितरण चे उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे, ग्रामविकास अधिकारी आर.जी.पठाण ,सरपंच रामकोरबाई बिरारे, उपसरपंच प्रविण जाधव, ग्रामपंचायत सदस्य गजानन गदाई, भागवत शिंदे, अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके ज सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गोंडे तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ पवार आदींसहित वस्तीवरील नागरिक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!