🕒 1 min read
मुंबई: आज उत्तर प्रदेश निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे आज विविध पक्षातील नेत्यांनी मतदारांना आपल्यालाच मत देण्याचे आवाहन केले आहे. तर १० मार्च नंतर उमेदवारांचे भविष्य कळेल. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसने एक मुद्दा लावून धरला आहे. तो म्हणजे निवडणूक संपताच पेट्रोल-डीजेलच्या किमती वाढणार. आता यावरच राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही मतदारांना आवाहन केले आहे.
“मतदान संपताच जर उद्यापासून इंधनाच्या किंमती वाढल्या तर लक्षात घ्या. केंद्रातलं सरकार बदलण्याची हीच योग्य वेळ आहे.”, असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले आहे. यापूर्वी पेट्रोल-डीजेलच्या किंमतीवरूनच राष्ट्र्वादीचे नेते रोहित पवार( Rohit Pawar) यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
मतदान संपताच जर उद्यापासून इंधनाच्या किंमती वाढल्या तर लक्षात घ्या केंद्रातलं सरकार बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. #Petrol #DieselPrice
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 7, 2022
पाच राज्यातील निवडणुका होताच केंद्र सरकार आपल्या आवडीचा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ती ७ तारखेला मतदान होताच होईल की निकालानंतर हे बघावं लागेल. असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता. तसेच लोकांना दिलासा देण्याची सरकारची जर इच्छा असेल तर एक्साईज ड्युटी कायम ठेवून सेस कमी करावा.जेणेकरुन त्याचा फटका राज्यांना बसणार नाही. असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या:
-
“…तर राष्ट्र्वादीचे नेते राज्यात कसे फिरतात हे पाहू”, ‘त्या’ घटनेवरून नितेश राणेंचा इशारा
-
IPL 2022: आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर ; वाचा कोणत्या तारखेला कोणाचा सामना!
- ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच चर्चेत; चाहत्याने पती अभिषेक बच्चनकडे केली तक्रार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
