Share

“ही महाविकास आघाडी नव्हे तर नाराज तिघाडी”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून महाविकास घडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच ही महाविकास आघाडी नव्हे तर नाराज तिघाडी आहे, असेही उपाध्ये म्हणाले आहेत.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मागील २ वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली राज्याच्या मुलभूत प्रश्नांना बगल दिली. शेतकरी आत्महत्या, वीज कनेक्शन कापली जातायेत, एसटी कर्मचारी हवालदिल झालाय. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद तसाच कायम आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी आणि सर्वात महत्त्वाचं भ्रष्टाचार याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. राज्याच्या विकासासाठी आघाडी बनवली असा दावा करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये रोज काही ना काही नाराजी असल्याचं समोर येते.’ तसेच नाराजी दूर करण्यातच मुख्यमंत्र्यांचा वेळ जात असेल तर जनतेचे प्रश्न सोडवणार कोण?, असा सवालही उपाध्येंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!