Share

‘खंडणी आणि टक्केवारी सोडून बाकी प्रत्येक गोष्टीत या सरकारला संभ्रम’

Published On: 

मुंबई : मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (school reopening in Mumbai) आजपासून सुरु होण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने तसा निर्णय जाहीर केला असून महानगरपालिका संभ्रमात असल्याचे दिसून आले. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे. खंडणी आणि टक्केवारी सोडून बाकी प्रत्येक गोष्टीत या सरकारला संभ्रम आहे, अशी टीका भातखळकरांनी केली आहे.

राज्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मात्र शिक्षक आणि पालकांच्या मनात अद्यापही संभ्रमांचे वातावरण आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरातील पालिका प्रशासनाने शाळा सुरू करण्याबाबत नकार दाखवला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या सावटामुळे शाळा सुरू करण्याबाबत कमालीचा संभ्रम दिसून येत आहे.

मुंबईत शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांच्यात बैठकी होत आहेत. पालक संघटनांशी चर्चा करुन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ असा पवित्रा लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. आजपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याच्या सुचना अद्याप मिळाल्या नाहीत. त्यामुळे शाळा सुरु करण्याची तयारी अद्याप केलेली नसल्याचे शिक्षक सांगत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!