Share

‘ही लढाई ड्रग्ज माफिया, त्यांच्या पेरोलवर असलेले महाराष्ट्रातील राजकारणी आणि एनसीबीमध्ये’

Published On: 

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. समीर वानखेडे यांच्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना जोरदार रंगला होता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यावरुनही भाजपने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हा प्रश्नसत्य आणि असत्याच्या लढाईचा आहे. खरं आणि खोट्याची लढाई आहे. पाहू आता काय होते ते, असं सांगितलं. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना उत्तर दिलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत राऊतांना सुनावलं आहे.

झूठ…,ही लढाई ड्रग्ज माफिया, त्यांच्या पेरोलवर असलेल्या महाष्ट्रातील राजकारणी आणि एनसीबी यांच्यामध्ये सुरु असल्याचं सांगितलं आहे.

क्रांती रेडकरांचा काय संबंध आहे? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकर यांच्यावर कुणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केलीय असं माझ्या पाहण्यात नाही. ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत ना, ते काय अमराठी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!