नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ते नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्त राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडी कारवाईबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केले. ‘ते’ माजी गृहमंत्री ईडीला ‘वेडे’ समजलेत बहुदा, असं म्हणत राज ठाकरेंनी उपरोधिक टोला लगावला आहे.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर देशमुखांच्या मागे ईडी, सीबीआय आणि प्राप्तीकरण विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्या मालमत्तेवर अनेकदा धाड टाकण्यात आली आहे. तसेच अनेकदा नोटीस बजावून देखील ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यावरूनच आता राज ठाकरेंनी टीका केली आहे.
‘सरकारच्या कोरोनाच्या लाटा थांबतच नाहीत. टोलवरुन आम्ही आंदोलनं केली, अनेक टोल बंद झाले. सरकार आणि विरोधक येतात तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. राज्यात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्यासाठी शरीयत सारखा कायदा आणायला पाहिजे. त्याशिवाय हे सुधारणार नाहीत. कोणाला कुठल्या गोष्टीची भीतीच उरली नाही. माजी गृहमंत्र्यांना चौकशीसाठी ईडी बोलावते. ते जात नाहीत. ते ईडीला येडे समजले बहुदा. ज्या ठिकाणी सरकारी यंत्रणांना दुय्यम समजले जाते, तिथे अशा घटना घडणारच, अशी टीका ठाकरेंनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- महंत नरेंद्र गिरींच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं मृत्यूचं खरं कारण
- पुरावे असतील तर खुशाल तक्रार करा; अजित पवारांचं दरेकरांना सडेतोड उत्तर
- मोदी सरकार अडचणीत! पेगासस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
- ‘आतापर्यंत नाहक राज्य सरकारला बदनाम केले, पण वस्तुस्थिती समोर’, अजितदादांचा केंद्रावर निशाणा
- ओबीसी आरक्षण; महाराष्ट्राला इम्पेरिकल डेटा देण्यास मोदी सरकारचा नकार, सुप्रीम कोर्टात सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

