सोलापूर : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून पडळकर हे घोंगडी बैठकांसाठी आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ओबीसी नेते आहेत. या महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेते असतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपद का मिळाले नाही. तसेच धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष का केले नाही, असा सवाल पडळकरांनी विचारला आहे. भाजपमध्ये सर्वाधिक आमदार ओबीसीचे असून सत्ता असतानाही भाजपने अनेक ओबीसी समाजातील नेत्यांना संधी दिल्याचंही ते म्हणाले.
ओबीसींच्या संदर्भात इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं होतं, मात्र राज्य सरकारनं ते केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली, असंही ते म्हणाले. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असंही ते म्हणाले.
‘महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजा-समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका!’, थोरातांच्या कन्येला पडळकरांचे प्रत्युत्तर
- ‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामे करता का?’, हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले
- ‘फडणवीसांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर कारवाई करा’, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढवण्याचा प्रयत्न’, जयंत पाटील यांची माहिती
- ‘तू फक्त माझ्या पैशाचा व मनाचा वापर केलास’, प्रेयसीने दुसऱ्याशी साखरपुडा केल्याने प्रियकराची आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

