🕒 1 min read
मुंबई : येत्या २४ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध भारत तिसरा सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये रंगणार आहे. या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा १७ जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहलीच करणार असून, अजिंक्य रहाणे उपकर्णधार असणार आहे. याशिवाय रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारास शुबमन गिल हे फलंदाज संघात कायम असून गोलंदाजांमध्ये आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज कायम आहेत.
यावरच इंग्लंडविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याचा अंतिम संघात समावेश करण्यात यावा. तसेच जर तो गोलंदाजी करू शकत असेल तर त्याचा अतिरिक्त लाभ संघाला होईल, असा सल्ला विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी दिला आहे.
जर पंड्या गोलंदाजी करण्यास समर्थ असेल तर त्याला संघात स्थान देण्यात यायला हवे. तिसरा कसोटी सामना अहमदाबादला होत आहे. मोटेराची खेळपट्टी नवीन असल्याने तेथे कशाप्रकारची खेळपट्टी असेल हे सांगणे कठीण आहे. पण या सामन्यात विराट कोहलीने तीन वेगवान गोलंदाज व दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उरतावे.
महत्वाच्या बातम्या
- यंदा आयपीएल ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर जिंकणार मैक्सवेलने दाखवला विश्वास
- ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शकपणे करा; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आवाहन
- “…तर राज्यात पेट्रोलचे दर ७५ रुपये लीटर होईल”
- ‘प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा’ ; आरोग्य मंत्री टोपे यांचे आदेश
- वर्दीत धरला ठेका; तडकाफडकी कारवाई


