Share

विंडीजचे आव्हान कायम; बांगलादेशवर रोमहर्षक विजय

Published On: 

🕒 1 min read

शारजा : ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशला तीन धावांनी पराभूत करत विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. निकोलस पूरनच्या २२ चेंडूत ४० धावा या तुफान फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने शुक्रवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात बांगलादेशला तीन धावांनी पराभूत केले. यामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

हा सामना शारजा येथे झाला होता. या सामन्यात विंडीजने १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकांत ५ बाद १३९ धावा करता आल्या. सलग तिसऱ्या पराभवामुळे त्यांना उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य झाले आहे.

दरम्यान आघाडीच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यावर लिटन दास (४४) आणि कर्णधार महमदुल्ला (नाबाद ३१) यांनी पाचव्या गडय़ासाठी ४० धावांची भागीदारी उभी केली. त्यानंतर दासला ड्वेन ब्राव्होने माघारी पाठवले. दरम्यान बांगलादेश संघाला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज असताना आंद्रे रसेलने केवळ नऊ धावा दिल्या. आणि विजय खेचून घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!