Share

उपराष्ट्रपतींकडूनही रहाणेवर कौतुकाची थाप

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.

नवख्या खेळाडूंना सोबत घेत रहाणेने भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला. यामुळे कर्णधार रहाणेला क्रिकेटविश्वातून कौतुक करण्यात आलं. विराटऐवजी रहाणेलाच कर्णधार करा, अशी मागणी करण्यात आली. रहाणेचं भारतात परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं.

अजिंक्य रहाणेवर होणारा कौतुकाचा वर्षाव अद्यापही थांबलेला नाही आहे. भारत-ऑस्ट्रेलिया  सीरिजमध्ये लाखमोलाची कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचं आणि कसोटीदरम्यान कर्णधारपद ताकदीने सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेचं  नाव आजही सर्वांच्या तोंडी आहे. अनेक महिन्यांनी अशाप्रकारे तोडीस तोड खेळ पाहायला मिळाल्याने हे कौतुक होत आहे.

राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी देखील अजिंक्य रहाणे आणि त्याच्या चमूचं कौतुक केलं आहे. त्यांनी या विजयाबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. याआधी त्यांनी ट्वीट करून देखील टीम इंडियाचं कौतुक केलं होत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!