🕒 1 min read
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊन वर्ष उलटून गेले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांना केराची टोपली दाखवली आली आहे. आरे कारशेड, जलयुक्त शिवार योजना, हायपरलूप प्रकल्प व शिक्षक बदली अशा अनेक निर्णयांना ठाकरे सरकारकडून स्थगिती मिळाली आहे तर काही निर्णय बदलण्यात देखील आले आहेत.
दरम्यान, मंत्र्यांच्या विदेशवारीवर होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी खर्चांवर निर्बंध आणण्याचा फडणवीस सरकारने घेतलेला निर्णयही विद्यमान सरकारने स्थगित केला आहे. यावर भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चांवर आणल्याचा हवाला देत फडणवीसांच्या निर्णयाला ठाकरे सरकारने स्थगिती दिल्याचं वृत्त अतुल भातखळकर यांनी शेअर केले आहे.
‘मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेले निर्बंध मुख्यमंत्री ठाकरे यांनी रद्द केले. थोडक्यात, तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी आहे. मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही असं ट्विट करत भातखळकर यांनी सरकावर तोफ डागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पॉपस्टार रीहानाच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटला माजी क्रिकेटपटूचे प्रतिउत्तर !
- काकांनी आता निवृत्त व्हावे; पुतणे आशिष यांचा अनिल देशमुखांना घरचा आहेर
- ‘एल्गार परिषदेच्या आडून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव’
- अत्याचार पीडितेची ओळख सांगू नका, औरंगाबाद खंडपीठाचे माध्यमांना निर्देश
- आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण- भालचंद्र शिरसाट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
