Share

प्रेमाचा करुण अंत! रेल्वेखाली उडी घेऊन युवक-युवतीची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

जालना : जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुण-तरुणीने औरंगाबाद येथून हैदराबादकडे जाणाऱ्या मनमाड-काचीगुडा या धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दरेगाव शिवारातील रेल्वे रुळावर घडली.

तुषार प्रेमानंद रगडे (वय २०, चंदनझिरा), शितल शरद कान्हे (वय १९, पांगरखेडा, ता.अंबड) अशी मृतांची नावे आहेत. या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी आढळलेल्या एका बॅगेतून मिळालेल्या कागदपत्रांवरून दोघांची ओळख पटली आहे.

दरेगाव शिवारात मनमाड-काचीगुडा एक्स्प्रेसखाली येऊन एक तरुण व एक तरुणी ठार झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी चंदनझिरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तरुण-तरुणीचे मृतदेह रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न झाला होता.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. घटनास्थळी आढळलेल्या एका बॅगेतून मिळालेल्या कागदपत्रांवरून दोघांची ओळख पटल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!