मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना (India Tour of South Africa) होण्यापूर्वी टीम इंडियासाठी दिलासा देणारी बातमी आहे. 16 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यावर संघाच्या खेळाडूंना कठीण क्वारंटीनमध्ये राहावे लागणार नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी फक्त एक दिवस आयसोलेशन असेल आणि त्यांची तीन वेळा कोविड-19 चाचणी केली जाणार आहे. चाचणीचे निकाल आल्यानंतर सगळे खेळाडू आणि स्टाफ आयसोलेशनमधून बाहेर पडू शकेलशकणार आहेत. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील क्वारंटाईन टाळण्यासाठी बीसीसीआयने 13 डिसेंबरपासून मुंबईत तीन दिवसांच्या क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे. क्वारंटाईन संपल्यानंतर, खेळाडू आणि स्टाफ चार्टर्ड फ्लाइटने जोहान्सबर्गला रवाना होतील, तिथे गेल्यानंतर देखील त्यांची तीन वेळा चाचणी केली जाईल.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, संघ इथे पोहचल्यानंतर लगेच क्वारंटाईनमध्ये जाईल आणि हॉटेलमध्ये आल्यावर त्यांच्या चाचणीच्या निकालानंतर त्यांना अलग ठेवण्यापासून मुक्त केले जाईल. कोविड-19 चाचणीचे निकाल यायला एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

