Share

“मुख्यमंत्र्यांचे विधान केवळ धक्कादायकच नाही तर महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव”,अतुल भातखळकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भ्रष्टाचार काढणाऱ्यांचा इलाज करू असे म्हटले होते. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

“भ्रष्टाचार काढणाऱ्यांचा इलाज करू” हे मुख्यमंत्र्यांचे विधान केवळ धक्कादायकच नाही तर महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव आहे. “ना खाऊंगा ना खाने दुंगा” म्हणणाऱ्या पंतप्रधानांचा शिवसेना द्वेष का करते तेच यातून स्पष्ट होते.”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान किरीट सोमाय्यांच्या आरोपांवरच आज संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. १५ तारखेला शिवसेनेची पत्रकार परिषद असून त्यापूर्वी काय फाईली दाखवायच्या त्या, दाखवाव्या. १५ तारखेला ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होणार, आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद होणार. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!