🕒 1 min read
गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील अशी चिंता चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे, असेही रावत यावेळी म्हणाले.
यावेळी बोलत असतांना रावत म्हणाले की, ‘अफगाणिस्तानमध्ये सध्या जे घडत आहे त्याचे परिणाम जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसू शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला त्यासाठी तयार राहायला लागेल. आपल्या सीमा बंद करा, देखरेख आणि टेहाळणी महत्त्वाची बाब आहे. बाहेरून देशात कोण येतंय याकडे आपली नजर असली पाहिजे. येणाऱ्यांची तपासणी करायला हवी.’ तसेच सामान्य नागरिक आणि पर्यटकांना या कडेकोट तपासणीचा त्रास होईल. मात्र, हे सर्व त्यांच्या सुरक्षेसाठी आहे हे त्यांना समजून घ्यावं लागेल. प्रत्येक नागरिकाला देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयी जागृक केलं पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी कुणीही येणार नाही, आपल्यालाच आपलं स्वतःचं, आपल्या लोकांचं आणि आपल्या संपत्तीचं संरक्षण करावं लागेल. देशाची अंतर्गत सुरक्षा आपल्यासाठी काळजीचा विषय आहे. याला तोंड देण्यासाठी आपल्याला नागरिकांना प्रशिक्षित करावं लागेल,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’जर देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचं/तिचं कर्तव्य समजले तर आपल्याला देशाची अंतर्गत सुरक्षा राखू शकू. नागरिकांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत त्यांच्या कर्तव्याचे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य बजावलं तर आपल्याला या परिस्थितीचा सामना करता येईल. तुमच्या शेजारी कोण लोक येऊन राहतात याविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे.’ तसेच आपण सतर्क असलो तर कोणताही दहशतवादी आपल्या शेजारी येऊन राहू शकत नाही. कुणालाही काहीही संशयास्पद वाटलं तर नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजे. तसेच त्याविषयी पोलिसांना माहिती दिली पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’


