Share

‘मुंबईतील दुर्घटनांना बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळी दुनिया जबाबदार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शनिवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामुळे रविवारी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, पाणी तुंबणे, इमारती पडणे याला महापालिका प्रश्नासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी हल्लाबोल केला होता. विरोधकांच्या टीकेला आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून प्रत्युत्तर देत महापालिका वगळता पाऊस, नागरिक यांच्यावरच खापर फोडलं आहे.

यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. ‘ “मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच, काहीही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्या” असं संजय राऊत म्हणतात. हो खरंच, पालिकेतील टक्केवारीजीवी बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळी दुनिया जबाबदार आहे, मुंबईकरांच्या जीवितहानीसाठी,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!