Share

‘मुंबईवरील भविष्यातील संकटाचे हे संकेत तर नाही ना?’; भाजप नेत्याने व्यक्त केली भीती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे.  आजही जोराचा पाऊस पुन्हा सुरू झाला असून सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री (दि. १७ जुलै) रोजी सुरु झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. अवघ्या ८ तासांमध्ये २०० मिलीमीटर पाऊस झाल्याने विविध ठिकाणी दुर्घटना देखील झाल्या.

अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, पाणी तुंबणे, इमारती पडणे याला महापालिका प्रश्नासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी हल्लाबोल केलाय.

तर, मुंबईची सध्यस्थिती पाहता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी भविष्यातील संकटाबाबत भीती व्यक्त केली आहे. ‘मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही. भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले. गेली पंचवीस वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतलेल्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना?’ असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच, ‘तातडीने महापालिकेसह लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी…या विषयातील तज्ज्ञांना बोलवावे व त्वरीत आवश्यक असतील ते निर्णय घ्यावेत. मुंबईत यावेळी दिसणारे हे बदल धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ?’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे योग्य उपाययोजनांसाठी विनंती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!